HW News Marathi
देश / विदेश

सर न्यायाधीश गोगोई यांचा ‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला

नवी दिल्ली | सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी ‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाशीपदाची नुकतीच धुरा सांभाळणारे रंजन गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कामकाजांच्या दिवशी न्यायाधीशांना सुट्टी न देण्याचा निर्णय गोगोई यांनी घेतला आहे. देशात सध्या तीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे नो लीव्हा हा फॉर्म्यूला लागू केला आहे.

सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबरला देशाचे ४६वे सर न्यायाधीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टमधील प्रलंबित करोडो प्रकरणांचे ओझे हलके करण्यासाठी त्यांनी पावले उचलणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते.

पद भार स्वीकारल्यानंतर गोगोई यांनी आठवड्याभरात त्यांनी प्रत्येक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि दोन वरिष्ठ न्यायाधीशांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. गोगोई यांनी न्यायाधीशांना कामकाजाच्या दिवशी एलटीसी घेण्यावरही बंदी आणली आहे. ही सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जास्त कालावधी लागेल. त्यामुळे नो लीव्हा हा यावर तोडगा काढला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधानांनी केली पीएम-श्री योजनेची घोषणा

Manasi Devkar

लोकसभा आणि विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनांचे बिगुल !

News Desk

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण

News Desk
राजकारण

…त्या दिवशी पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल !

Gauri Tilekar

इंदूर | नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा राफेल कराराच्या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. “ज्या दिवशी राफेल विमान कराराची चौकशी होईल त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जावे लागेल” असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. “मोदी यांना केवळ भ्रष्ट म्हटले जात नाही तर ते खरोखरच भ्रष्ट आहेत. याबाबत कोणतीही शंका असता कामा नये” असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

”ज्या दिवशी राफेल करार प्रकरणाची चौकशी सुरू होईल त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जावे लागेल. राफेल हे भ्रष्टाचाराचे एक मोठे प्रमाण आहे. आपले मित्र अनिल अंबानी यांचा फायदा करवून देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक नियम आणि कायद्यांचा भंग केला आहे. राफेल कराराव्यतिरिक्त देखील अनेक मोठी प्रकरणे आहेत”, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये देखील राफेल कराराची चौकशी सुरू होण्याचे शक्यता असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Related posts

शिवसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील

Aprna

नितीन गडकरींनी नौदलाची माफी मागावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

News Desk

विरोधक असतानाही महाविकास आघाडीमध्ये समन्वय असायला व्हावा! – संजय राऊत

Aprna