HW News Marathi
देश / विदेश

आधी वृत्त, नंतर माफी

मुंबई | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे वृत्त सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शनने दिले होते. निधनाचे वृत्त प्रसारीत करण्याची अति घाई मात्र दूरदर्शनच्या चांगलीच अंगाशी आली आहे. याप्रकरणी दूरदर्शकडून माफी देखील मागण्यात आली आहे.

सध्या अटल बिहारी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र दूरदर्शनने त्यांच्या निधनाचे वृत्त दिल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

तसेच दूरदर्शनने दिलेले वृत्त खरे मानून अनेक वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींच्या निधनाचे वृत्त दिले होते. मात्र या वृत्तवाहिन्यांनी देखील हे वृत्त दाखवणे बंद केले आहे. आज संध्याकाळी एम्स रुग्णालयाकडून अधिकृत बुलेटीन जारी करण्यात येणार आहे. यामधून वाजपेयींच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काही लोकं दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत, मोदींचा शेती विधेयकावरून टोला!

News Desk

OBC आरक्षणासंदर्भात उद्या होणार सुनावणी

News Desk

कोविड-१९ तपासणी केंद्रांसाठी ‘या’ ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

News Desk
मुंबई

मेट्रोचा खांब बेस्टवर कोसळला

swarit

मुंबई | कांदिवली येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास मेट्रोचे काम सुरू आहे. या कामा दरम्यान मेट्रोचा एक खांब उभारणीसाठी तयार करण्यात आलेला लोखंडी सळ्यांचा खांब ७११ क्रमांकाच्या बेस्ट बसवर कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

या अपघातांनंतर त्या परिसरातील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातासंदर्भातील सर्व माहिती घेतली असून अपघाताची कारणांचा शोध घेतला जाणार आहे.

Related posts

चेंगराचेंरीत मृत झालेला तरूण जीवंत

News Desk

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, २ जणांचा होरपळून मृत्यू

News Desk

शहीद कॉन्स्टेबल स्व. विलास शिंदे चौक

News Desk