HW News Marathi
देश / विदेश

इस्रोच्या G SAT-29 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोट्टा | इस्रोच्या G SAT-29 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. श्रीहरीकोट्टाहून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्रोच्या मते, हवामान स्वच्छ असल्याने या उपग्रहाचे प्रक्षेपणात कोणतीही समस्या उद्भवली नाही.

“G SAT-29 या उपग्रहावर ‘हाय रिझोल्युशन कॅमेरा’ बसविण्यात आला आहे. यामुळे हिंदी महासागरातील भारताच्या शत्रूंच्या हालचाली आणि त्यांच्या जहाजावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच या संचार उपग्रहामुळे जम्मू आणि काश्मीर, भारताच्या उत्तर-पूर्व भागात इंटरनेटची सोय उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे”, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली आहे.

आपल्या दुसऱ्या उड्डाणात जीएसएलव्ही-एमके ३ हे रॉकेट G SAT- 29 भूस्थिर कक्षेत स्थापित करणार आहे. या उड्डाणाला गाजा चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे या उपग्रहाचे प्रक्षेपण हे हवामानावर अवलंबून असून हवामान अनुकूल नसल्यास प्रक्षेपण टाळण्यात देखील येऊ शकते असे सांगण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

Aprna

मी भाजपमध्ये जाणार नाही, पायलट निर्णयावर ठाम !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी देशाला संबोधित करणार

News Desk
राजकारण

राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार असेल तर आमचा नक्कीच पाठिंबा असेल !

News Desk

पुणे | राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार असेल तर आम्ही नक्कीच पाठिंबा देऊ. परंतु बेरोजगारी, कुपोषण हे प्रश्न राम मंदिर बांधूनही कायम रहाणार असतील तर त्याचा उपयोग काय ? अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील राम मंदिर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होताना पाहायला मिळत आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी काल (मंगळवार) त्यांची बाजू चौकशी आयोगासमोर मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर सांगितले की, “१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास भीमा-कोरेगाव येथे हिंसाचारास सुरुवात झाली. मला माहिती मिळताच मी लगेच पुणे ग्रामीण पोलिसांशी फोनवरुन संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण मला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.” मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना, पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन हे सर्व या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Related posts

पालघरची स्वाभिमानी जनता कॉंग्रेसच्या उमेदवाराला विजयी करेल

News Desk

ही योग्य वेळ नाही म्हणत लेखिका गीता मेहतांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

News Desk

राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांकडून दोषारोप पत्र दाखल

Aprna