HW News Marathi
राजकारण

राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार असेल तर आमचा नक्कीच पाठिंबा असेल !

पुणे | राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार असेल तर आम्ही नक्कीच पाठिंबा देऊ. परंतु बेरोजगारी, कुपोषण हे प्रश्न राम मंदिर बांधूनही कायम रहाणार असतील तर त्याचा उपयोग काय ? अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील राम मंदिर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होताना पाहायला मिळत आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी काल (मंगळवार) त्यांची बाजू चौकशी आयोगासमोर मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर सांगितले की, “१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास भीमा-कोरेगाव येथे हिंसाचारास सुरुवात झाली. मला माहिती मिळताच मी लगेच पुणे ग्रामीण पोलिसांशी फोनवरुन संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण मला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.” मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना, पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन हे सर्व या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर गल्ली ते दिल्ली सरकार हे एक मोठी सर्कसच आहे | धनंजय मुंडे

News Desk

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी !

News Desk