HW News Marathi
देश / विदेश

कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस बॉस जबाबदार नाही | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | एखाद्या कर्मचाऱ्याने कार्यालयातील कामाच्या प्रचंड ताणावामुळे आत्महत्या केली, तर त्यासाठी बॉस किंवा वरिष्ठ जबाबदार नसणार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय महाराष्ट्रातील औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावर दिला आहे. औरंगाबाद खंडपीठाने हे आरोपपत्र फेटाळून लावल्यानंतर पराशर यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

काय आहे प्रकरण

महाराष्ट्रातील शिक्षण विभागाच्या औरंगाबाद कार्यालयात कार्यरत असलेल्या किशोर पराशर यांनी ऑगस्ट २०१७ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीने बॉसच्या जाचाला कंटाळून पराशर यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसात केली होती. पराशर यांच्यावर कामाचा प्रचंड ताण होता, ते संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यालयात काम करत राहवे लागत होते, असे त्यांच्या पत्नीने पोलीस तक्रारीत म्हटले होते. तसेच बॉस सुट्टीच्या दिवशी त्यांना कामावर बोलावले जाईल. किशोर पराशर यांचा एका महिन्याचा पगारही रोखला होता. या तणावामुळे पराशर यांनी आत्महत्या केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मौनी मोदी, बँक घोटाळ्यावर शांत का ?  कॉंग्रेसची मोदींवर टीका

swarit

महाराष्ट्र सरकार विरुद्ध CBI, आता परवानगीशिवाय CBI ला राज्यात परवानगी नाही

News Desk

धोका टळला | चीनचे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

News Desk