HW News Marathi
देश / विदेश

दाऊदची संपत्ती जप्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवीदिल्ली |सुप्रिम कोर्टाने दाऊद इब्राहिमच्या संपत्ती संदर्भात शुक्रवारी निकाल देत सरकारला दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली आहे. दाऊदची बहीण हसीना पारकर आणि आई अमीना बी यांच्या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने मुंबईतील दाऊदची करोडो रुपयांची संपत्ती जप्त होणार असल्याचे म्हटले आहे.

अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मुंबईच्या नागपाडा येथे करोडो रुपये किंमतीची संपत्ती आहे. एवढेच नाही तर त्यापैकी दोन संपत्ती अमीना व पाच संपत्ती हसीना यांच्या नावावर आहेत.

दाऊदची ही संपत्ती बोकायदेशीर असल्याचे तपास यंत्रनेला आढळून आले आहे त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली आहे. दाऊदची बहीण हसीना आणि आई अमीना यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. संपत्ती जप्त करण्याच्या नोटीसला आव्हान देण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात यावा अशी मागणी करत आपल्याला योग्यरित्या नोटीस देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर संबंधित विभांगाने त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली. त्यामध्ये केंद्र सरकारने गतवर्षी दाऊदच्या दक्षिण मुंबईतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा लिलाव केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देशाच्या अर्थसंकल्पाबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या…

Aprna

मराठमोळे मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला

News Desk

भारत-पाक सीमेवर २,०६१ पैकी केवळ ६६१ फेन्सिंग लाईट पोल्सच चालू

News Desk
मुंबई

भुलाबाई देसाई रोडवरील गाळ्यांना भीषण आग

News Desk

मुंबई | भुलाबाई देसाई रोड येथील प्रेमसन्स हाऊसच्या मागे असलेल्या तीन गाळ्यांना शुक्रवार २० एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन गाड्यांसोबतच एक रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली.

अचानक लागलेली ही भीषण आग आग विझवण्यात अग्निशमन दला यश आले. परंतु आग लागल्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

भुलाबाई देसाई मार्गावर दाटीवाटीने दुकाने असल्यामुळे आग लागताच इतर दुकानांचे नुकसान झाले आहे. एका दुकानाला प्रथम आग लागली होती परंतु आगीचे प्रमाण वाढताच बाजूच्या दोन दुकानांनी सोबत पेट घेतला. या आगीच्या वलयात दोन दुकाने आली. या तिन्ही गाळ्यातील सामान जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Related posts

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

News Desk

‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्र्यांना केले होते सावध

News Desk

मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी मुंबईचा  विदूर दीक्षित सज्ज

News Desk