HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालायने भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानात पाठविण्याबाबतची याचिका फेटाळली

नवी दिल्ली | केंद्र सरकारला भारतात राहणाऱ्या सर्व मुस्लिम समुदायातील लोकांना पाकिस्तानमध्ये पाठविण्याचे, तसेच पाकिस्तानमधील हिंदूंना भारतात बोलाविण्याचे निर्देश देण्यात यावेत,अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती विनित सरन यांच्या खंडपीठामोर ही याचिका आली होती.

या याचिकेवर न्यायमूर्तींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. “हा काय प्रकार आहे ? तुम्हाला माहिती होते कि न्यायालयात जरी या याचिकेवर सुनावणी झाली तरीही तुमच्यावर टीका करण्यात येईल. तुम्ही हा मुद्दा खरंच गंभीरपणे मांडला आहे का याविषयी शंका आहे. “, असे म्हणत न्यायालयाने याचिककर्त्याच्या वकिलांना खडे बोल सुनावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर पडा, भाजपशी युती करा ! आठवलेंचीही उद्धव ठाकरेंना साद

News Desk

राजनाथ सिंहांनी केली राफेलची पूजा, भारतीय वायू दलाच्या ताफ्यात

News Desk

काश्मीर मुद्द्यावरून अमित शहा आणि अजित डोवाल यांची बैठक

News Desk
मुंबई

सीएसएमटी पूल दुर्घटनेमुळे बंद केलेला रस्ता तब्बल ३६ तासानंतर पुन्हा सुरू

News Desk

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जवळील हिमालया पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सेंट जॉर्ज, जी. टी., जे. जे.रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर पादचारी पुलालाखालून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. सीएसएमटी लगतचा डी. एन. रोड वाहतुकीस तब्बल ३६ तासानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

गुरुवारी पूल कोसळताच दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक जे. जे. उड्डाणपूल आणि सीसीएमटी या दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. दिवसभर पुलाचे पाडकाम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली होती. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाचा लोखंडी सांगाडा शुक्रवारी (१५ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. कटरच्या साह्याने लोखंडी सांगाडा कापून तो जंबो क्रेनद्वारे खाली उतरवण्यात आला.

Related posts

विलेपार्ले ते गोरेगावपर्यंत २० टक्के पाणी कपात

swarit

देहविक्री रोखण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

News Desk

सिमेंट गोदामावरील दरोडा फसला आणि पकडला गेला; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat