HW News Marathi
देश / विदेश

जिल्हाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

पाटणा( वृत्तसंस्था)- बिहारमधील बक्सर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिहारमधील माफियांनी त्यांची हत्या केली असावी किंवा वैयक्तिक कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याची माध्यमांच चर्चा आहे. परंतु जिल्हाधिकारी पदाची व्यक्ती इतक्या टोकाची भूमिका घेतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुकेश पांडे यांचा मृतदेह उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद रेल्वे स्थानकापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोटगाव रेल्वे ट्रॅकवर आढळून आला आहे. पांडे यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार पांडे यांच्या मृतदेहाजवळ पत्नीच्या नावाने लिहिलेली सुसाइड नोट आढळून आली आहे. मुकेश पांडे हे २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी बक्सरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला होता. यापूर्वी त्यांनी मोतीहारी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. मुकेश पांडे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार माफियांनी केल्याचीही चर्चा आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे – प्रकाश जावडेकर

News Desk

भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन

News Desk

कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

२० वर्षांपूर्वी मसूद अजहरची सुटका कोणी केली ?, सिद्धूंचा भाजपला सवाल

News Desk

काबुलवरून निघालेलं विमान भारतात सुखरूप पोहोचलं!

News Desk

…पण राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना वेळ दिली नाही ! अजित पवारांनी केले भाष्य 

News Desk