HW News Marathi
देश / विदेश

दहशतवादी हल्यात जखमी झालेल्या गर्भवती महिलेची यशस्वी प्रसुती

जम्मू-काश्मीर | सुंजवा कॅम्पमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात गर्भवती महिला गंभीर जखमी झाली होती. ही महिला ३५ आठवड्यांची गर्भवती असून शाजदा अहमद असे या महिलेचे नाव आहे. शाजदाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

सुंजवा कॅम्पमधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना शाजदा यांना गोळी लागली होती, ही गोळी लागल्यामुळे ९ महिने पूर्ण होण्या आधीच त्यांची प्रसुती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. पहिल्यांदा त्यांच्या शरीरातील गोळी काढण्यात आली. त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे त्यांची प्रसुती करण्यात आली. शाजदा यांनी २.५ किलोग्रॅम वजनाच्या चिमुकलीला जन्म दिला आहे. आई आणि मुलगी दोघीही पूर्णपणे स्वस्थ आहेत.

दहशतवाद्यांनी कॅम्पवर हल्ला केला त्यावेळी शाजदा आपल्या क्वॉर्टरमध्येच होत्या. गोळीबारीत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यावेळी लष्करी जवानांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी वेळीच सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

… तर फटाक्यांची माळच लागेल !, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत राज ठाकरेंचा इशारा

News Desk

‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळतेय!

News Desk

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील संसदेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून ते २६ जुलैदरम्यान

News Desk
देश / विदेश

सैन्याला ६ महिने लागतील तर संघ ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होईल – मोहन भागवत

News Desk

मुंबई | भारतीय लष्कराला सैन्य उभारीणीसाठी ६ ते ७ महिने लागतात. मात्र संघाचे स्वयंसेवक अवघ्या ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील’ असे वादग्रस्त वक्तव्य सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केले. मुजफ्फरनगर येथील बिहार व झारखंडमधील कार्यकर्त्यांना संबोधिक करताना बोलत होते.

संघ लष्करी सेना नाही मात्र आमची शिस्त ही लष्करासारख्यीच आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी आमच्या संघाचे स्वयंसेवक बलिदानास तयार आहेत. ‘ भारत-चीन युद्धाच्या वेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वयंसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणले तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणे कठीण होईल,’ असेही यावेळी भागवत यांनी सांगितले.

Related posts

रामायण पठण कार्यक्रमात दलितांना घराबाहेर न पडण्याचे फर्मान

News Desk

अमेरिकेडून भारताला दिवाळी भेट

News Desk

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर

News Desk