HW News Marathi
देश / विदेश

भय्यू महाराजांसह पाच गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

भोपाळ | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राज्य सरकारने पाच आध्यात्मिक गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त सचिव के. के. काटिया यांच्या आदेशानुसार भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महेत यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे.

नर्मदा नदी संवर्धनसंदर्भातील समितीवर पाच आध्यामिक गुरूंची समिती ३१ मार्च नेमण्यात आली होती. त्यामुळे समितीचे सदस्य म्हणून राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आल्याचे सरकारने सांगितले आहे. आध्यात्मिक गुरूंना समाजात आदर आहे. निवडणुकीमध्ये त्यांच्या नावाचा लाभ घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची टीका काँग्रेसने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक”, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

News Desk

सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरुर यांना जामीन मंजूर

News Desk

मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची ‘हार्वर्ड बिझनेस स्कुल’च्या डीनपदी नियुक्ती, राज ठाकरेंची पोस्ट

News Desk
मुंबई

अमित शहा उद्धव ठाकरे यांना भेटणार नाहीत – आशिष शेलार

News Desk

मुंबई | एकीकडे सत्तेत असूनही ऐकमेकांना डिवचण्याचा प्रकार शिवसेना आणि भाजप मध्ये सुरूच आहे. भाजपच्या स्थापना दिनी उद्यापासून भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुंबईत असून या दरम्यान ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार नसल्याचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. पक्षाच्या स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपचा ३८ स्थापना दिवस ६ एप्रिलला वांद्राच्या बीकेसी मैदानात होणार आहे. यासाठी पक्षाची जय्यत तयारी सुरु आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला ५ एप्रिलला संध्याकाळी मुंबईत येत आहेत. शहा यांचे स्वागत बाईक रॅलीने करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. वांद्रे येथेच शहा यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याच दिवशी संध्याकाळी ते मुंबईतल्या महत्वाच्या व्यक्तीला भेटणार आहेत. तसेच स्थापना दिवशी मेळाव्याला संबोधितही करणार आहेत.

या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर संध्याकाळी पक्षाच्या आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे भेटणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे. मात्र, वांद्र्यात असूनही ते ठाकरे यांना भेटणार की नाही अशी विचारणा करताच, ते वांद्रे इथेच असतील पण या व्यतिरिक्त त्यांचा कुणालाही भेटण्याचा कार्यक्रम नसल्याचे शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप स्थापना दिवसाचे शिवसेनेला आमंत्रण नाही

भाजपच्या स्थापना दिवसाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो कार्यकर्ते मेळाव्याला उपस्तिथ राहणार आहेत. मात्र, या मेळाव्याला कोणत्याही मित्र पक्षाला आमंत्रण देण्यात आले नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात २०१४चा अपवाद वगळता शिवसेना आणि भाजपने गेल्या २५ वर्षात एकत्रित निवडणूक लढवल्या आहेत. सर्वात जुना सरकारी पक्ष म्हणून भाजपने शिवसेने पक्षाच्या अनेक कार्यक्रमांचे निमंत्रण दिले होते. मात्र या स्थापना दिनी भाजपने शिवसेनेला डावलले असल्याचे चर्चिले जात आहे.

 

 

Related posts

जे. जे. हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टरांना मारहाण

News Desk

पोलीसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मिटला बेस्टचा संप

News Desk