HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील – ‘जन्माला यावे तर कर्नाटकात’

बेळगाव – ‘कर्नाटकात जन्मला आले तर जीवन धन्य होते’ असे राज्याचे महसूल मंत्री आणि समन्वयक मंत्री यांनी बोलून नाही तर चक्क गाणे गावून दाखविले. यामुळे सीमा भागात पाटील यांचा चांगला विरोध होत आहे. गेली अनेक वर्षापासून बेळगाव सीमा प्रश्न हा प्रलंबित आहे. पाटील यांना सीमा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने त्यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी दिली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाकच्या तवग गावातील दुर्गादेवी मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या कार्यक्रमात पाटील यांनी भाषणात या गाण्याची ओळ म्हटले. ‘हुट्टी दरे कन्नड नाडे हुट्टी बेकू’ असे या गाण्याचे बोल आहेत. कर्नाटकात जन्मला आले तर जीवन धन्य होते असे या ओळीचा अर्थ आहे. त्यामुळे सीमा भागात पाटील यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पाटील यांनी सीमा भागातील हुतात्म्यांचा तसेच बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी लाठ्याकाट्यात खात ६० वर्षे संघर्ष करणाऱ्या मराठी भाषिकांचा अवमान केला आहे. तसेच महाराष्ट्र द्रोह ही केला असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.

‘या कार्यक्रमाला बहुसंख्य कन्नड भाषिक होते. त्यामुळे त्या भाषेतूनच आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कन्नड भाषेतून आपण म्हटलेल्या त्या गाण्याच्या ओळी म्हणजे दुर्गा स्तुती होती. त्यावरुन एवढे वातावरण निर्माण करण्याचे कारणच नाही असे चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकर दिले. ’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींवर नाराजीचा प्रश्नच नाही, पण…, खासदार संभाजीराजे म्हणाले…

News Desk

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मंत्रीमंडळात लवकरच निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्याकडून ग्वाही

Aprna

विधानसभा निवडणुकीसाठी ‘भाजप’ची पहिली यादी जाहीर

News Desk