HW News Marathi
देश / विदेश

आज तिन्ही सेनादलांची संयुक्त पत्रकार परिषद

मुंबई | पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादीच्या तळावर हल्ला करून उद्धवस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने काल (२७ फेब्रुवारी) भारतीय वायुसेनेच्या हद्दीत घुसून लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पाकिस्तानचा हा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. यात भारताचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान बेपत्ता झाले.

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असून त्या पार्श्वभूमीवर आज सैन्य दल, वायुसेना आणि नौदल या तिन्ही दलाची आज (२८ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. पाकिस्तानमधील बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यानंतर प्रथमच तिन्ही सैनादल प्रमुख पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल (२८ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी वायु सेनेच्या घुसखोरी केल्याची अधिकृत माहिती दिली होती. “भारतीय वायू दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले मात्र वायुसेनेचे एक विमान अद्याप परतले नसून भारतीय वायुसेनेचा एक पायलट देखील परतलेला नाही”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यावेळी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्रान खान आज पाकिस्तानच्या २२ व्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार

News Desk

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा होतोय याचा मनःपूर्वक आनंद !

News Desk

योग सर्वांचा आहे, सर्वजण योगाचे आहेत !

News Desk