HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तान नमले, कमांडर अभिनंदन भारतात परतणार, इम्रान खानची घोषणा

नवी दिल्ली | भारताचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उद्या (१मार्च) भारतात परतणार आहे. यासंदर्भातील माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. “शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या (१ मार्च) सुटका करणार आहोत, असे इम्रान यांनी पाकिस्तानच्या संसदेत म्हणाले आहे.”

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून उद्धवस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने काल (२७ फेब्रुवारी) भारतीय वायुसेनेच्या हद्दीत घुसून लष्कराच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पाकिस्तानच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला. या कारवाईदरम्यान भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (२७ फेब्रुवारी) पाकिस्तानात कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून काल (२८ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी वायु सेनेने घुसखोरी केल्याची अधिकृत माहिती दिली होती. “भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले मात्र वायुसेनेचे एक विमान अद्याप परतले नसून भारतीय वायुसेनेचा एक पायलट देखील परतलेला नाही”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी त्यावेळी दिली होती. तेच पालयट म्हणजे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान होय. त्यांना सुखरुप पाठविणार असल्याचे इम्रान यांनी सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करीत आहे?, सामनातून मोदी सरकारला सवाल

News Desk

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिक माफी मागावी | भाजप

News Desk

अरुण जेटलींवर उपचार सुरू असलेल्या एस्म रुग्णालयामध्ये आग

News Desk