HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली  

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून कोरोना संक्रमण देशात वाढत आहे. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाविरुद्ध लढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. आवश्यक उपाययोजना केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरत आहे आहे असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी सुधारेल. त्याचबरोबर बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के वाढ झाली. तर आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगलं काम करत असल्याचा संकेत दिले आहेत अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. कोरोनानंतर भारताचा रिकव्हरी पाहून मूडीजने आपला अंदाज बदलला. यापूर्वी मूडीजने यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी उणे (मायनस) 9.6 टक्के राहील असं सांगितलं होतं. मात्र, आता बदल करून तो यंदाच्या वर्षात उणे 8.9 टक्के राहील असं सांगितलं आहे. तर पुढील आर्थिक वर्षासाठी यापूर्वी मुडीजने 8.1 विकासदर अंदाज वर्तवला होता. तो आता बदल करून 8.6 टक्के असा सांगितला आहे.भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, जीएसटी परतावा दहा टक्क्यांनी वाढला, बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के सुधार, मार्केटमध्ये रेकॉर्ड हाय, परदेशी गुंतवणूकही 13 टक्के अधिक

महत्वाचे मुद्दे –

* ऑक्टोबरमध्ये 1.05 लाख जीएसटी परतावा जमा झाला. परताव्यामध्ये 10 टक्के वाढ झाली : केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर

* वन नेशन वन रेशन कार्ड

01 सप्टेंबर 2020 पासून 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड लागू करण्यात आलं आहे. 68.6 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा झाला.

* आंतनिर्भर भारत -3.0 ची घोषणा.

* कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्था ला आणखी मजबूत करण्याचा केंद्र सरकार चा प्रयत्न आहे.

* कोरोना संक्रमण देशात वाढत आहे.

* भारतीय अर्थव्यवस्थाला मजबूत करण्यासाठी मागील पाऊले महत्वाचे ठरले आहे.

*भारतीय अर्थव्यवस्थाला ताकद मिळाली आहे.

*12 टक्के वीज ची खपत 12 टक्के वाढली आहे.

* रेल्वे मालवाहक ची 20 टक्के वाढ झाली आहे.

* बँक क्रेडिट मध्ये 5.1 टक्के वाढ झाले आहे.

* आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगला काम करत असल्याचा संकेत दिले आहे.

* विदेशी मुद्रा मध्ये सुधार झाले आहे.

* आत्मनिर्भर भारत 3.0 अंतर्गत नवीन घोषणा करण्याची वेळ आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल्या शतकातील कायद्यांनी राष्ट्रनिर्माण शक्य नाही, मोदींचं कृषी कायद्यावरुन अप्रत्यक्ष भाष्य 

News Desk

#CoronaVirus | राष्ट्रवादी अन् शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र भाजपही करणार आर्थिक मदत

News Desk

अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

Aprna