HW News Marathi
देश / विदेश

ही ममता बॅनर्जींची इमर्जन्सी आहे, आमची नाही !

नवी दिल्ली | भाजप सरकार सीबीआयचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या प्रकरणात भाजपचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत ममता यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “पश्चिम बंगालमध्ये जे काही सुरू आहे, ही ममता बॅनर्जींची इमर्जन्सी आहे आमची नाही,” असा आरोप जावेडकर यांनी केला आहे.

“पश्चिम बंगालमध्ये कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना अटक करणे हा लोकशाहीचा खून असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. तसेच ममतांना साथ देणारे विरोधी पक्षाचे नेते जामिनावर बाहेर आहेत. जे साथ देत आहेत ते महागठबंधन नाही तर ते एका दृष्टीकोणातून एकत्र आलेले नाहीत तर ते भ्रष्टाचारामुळे एकत्र आले आहेत. पुढे जावडेकर असे देखील म्हणाले की, ममता कोणाला वाचवत आहेत पोलिसांना की स्वतःला? असा घणाघातr आरोप ममतावर जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

 

आज (४ फेब्रुवारी) या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या (५ फेब्रुवारी) सुनावणी घेणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaRamMandir : जाणून घ्या…१०६ वर्ष जुन्या अयोध्या प्रकरणाचा रंजक घटनाक्रम

News Desk

शशिकलासाठी जेलमध्ये दोन कोटीचे किचन

News Desk

२०२४ साली लोकसभेच्या निमित्ताने राम मंदिराचा कळस उभारला जाईल !

News Desk