HW News Marathi
देश / विदेश

‘तलाक तलाक तलाक’ अखेर हद्दपार ..तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर !

नवी दिल्ली | राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक संमत करण्यात आले आहे . आज (३० जुलै) राज्यसभेत ९९ विरुद्ध ८४ या फरकाने हे बिल मंजूर करण्यात आले आहे. लोकसभेत बहुमत असल्याने हे विधेयक सहजरित्या मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळणार असून ३ वेळा तलाक म्हणणे हा गुन्हा ठरवले जाणार आहे.

राज्यसभेत आज (३० जुलै) सकाळी तिहेरी तलाक विधेयक मंजुरीसाठी ठेवण्यात आलं. या विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधकांनी हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी केली. त्याला भाजपने विरोध केला होता. मात्र, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याबाबत राज्यसभेत मतदान घेण्यात आलं. यावेळी सिलेक्ट कमिटीकडे हे विधेयक पाठवण्याचा प्रस्ताव १०० विरुद्ध ८४ मतांनी फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर तिहेरी तलाक विधेयकावर मतदान होण्यापूर्वी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी केली.

“आम्ही महिला सक्षमीकरणाच्या बाजूने आहोत, या विधेयकात काही दुरुस्ती करून ते मंजूर करण्यात यावे, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवायचे होते. पण सत्ताधाऱ्यांनी आमची मागणी धुडकावून लावली”, असे आझाद यांनी सांगितले. त्यानंतर मुख्य विधेयकावर मतदान घेऊन हे विधेयक मंजूर करण्यात आले. मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा तृणमूलमध्ये दाखल

News Desk

मराठमोळ्या निला विखे-पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान सल्लागार पदी निवड

News Desk

मुंबई हल्ल्यामागचा म्होरक्या हाफिज सईदला १० वर्षांचा कारावास

News Desk