HW News Marathi
देश / विदेश

ट्विटरने अखेर नेमला तक्रार अधिकारी, नव्या आयटी मंत्र्यांच्या इशाऱ्याने तीन दिवसात उपरती!

नवी दिल्ली | ट्विटरने अखेर देशाचे नवे आयटी नियम स्वीकारले आहेत. कंपनीने आपला निवासी तक्रार अधिकारी नियुक्त केला आहे. ट्विटरने आपल्या अधिकृत वेबसाइटवर सांगितले आहे की, त्यांनी विनय प्रकाश यांची तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारने २५ फेब्रुवारी रोजी नवीन कायदे लागू केले होते. हे नियम २५ मेपूर्वी म्हणजेच ३ महिन्यांत पाळले जायचे होते, परंतु ट्विटरने मुदत संपदल्यानंतर ४६ दिवसांनी या नियमांचे पालन केले आहे.

यापूर्वी २७ जून रोजी ट्विटर इंडियाचे अंतरिम तक्रार अधिकारी धर्मेंद्र चतुर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन आयटी नियमांचे पालन करण्यासाठी ट्विटर इंडियाने त्यांची काही आठवड्यांपूर्वी नियुक्ती केली होती.

नवीन आयटी मंत्री अश्विन वैष्णव यांनी ८ जुलै रोजी मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी पहिला इशारा ट्विटरला दिला होता. ते म्हणाले की, देशातील कायदे सर्वांपेक्षा वर आहेत आणि ट्विटरला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहेत.

मुळात मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राजीनामा दिला होता. नवीन आयटी कायद्यासंदर्भात सोशल मीडिया कंपन्यांसमोर रविशंकर प्रसाद देशाची प्रतिष्ठा वाचविण्यात अपयशी ठरले आणि याच कारणास्तव त्यांना मंत्रालयातून काढून टाकले गेले, असे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होणार | हवामान विभाग

News Desk

भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली, उपांत्यपूर्व फेरीत स्थान झाले निश्चित

News Desk

आयपीएलमध्ये खेळण्यासाठीच कोहलीने विश्रांती घेतली, ब्रॅड हॉजचा आरोप

News Desk