HW News Marathi
देश / विदेश

Union Budget 2021 | या ‘४’ राज्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा!

नवी दिल्ली | पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा करण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या चारही राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच केंद्र सरकारने या घोषणा केल्याची चर्चा आहे. निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूत १.०३ लाख कोटींचा नॅशनल हायवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

यातच इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्यात येणार आहे. केरळमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचे नॅशनल हायवे निर्माण करण्यात येणार आहेत. यावेळी मुंबई-कन्याकुमारी इकनॉमिक कॉरिडोअरचीही घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता- सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आसाममध्ये येत्या तीन वर्षात हायवे आणि इकनॉमिक कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी यावेळी केली आहे.

यावेळी रेल्वे आणि मेट्रोसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. रेल्वेसाठी १.१० लाख कोटींचं बजेट करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मेट्रो लाइट आणण्यावरही भर देण्यात आला आहे. कोच्ची, बेंगळुरू, चेन्नई, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्प तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#HathrasHorror | राहुल-प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटले तेव्हा नेमके काय घडले ?

News Desk

का पडला किंगखान ममता दिदींच्या पाया

News Desk

HW Exclusive :… म्हणून चीन भारतासोबत युद्धाचे धाडस करणार नाही !

News Desk