HW News Marathi
देश / विदेश

उन्नाव बलात्कार प्रकरण उत्तर प्रदेशाबाहेर चालविले जाणार

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१ ऑगस्ट) उन्नाव बलात्कारातील सर्व प्रकरणे उत्तर प्रदेशबाहेर चालविण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उन्नाव बलात्कार प्रकरणाचा संपूर्ण तपास तसेच या प्रकरणाची सुनावणी उत्तर प्रदेशबाहेर होणार आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी कुलदीप सिंह सेंगर यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असून हे प्रकरण उत्तर प्रदेशबाहेर चालविण्यात यावे, अशी मागणी पीडित कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाकडे पत्र लिहून केली होती. पीडित कुटुंबाची ही मागणी मान्य करत हे प्रकरण उत्तर प्रदेश बाहेर चालविण्यात येणार असून या प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीसाठी सॉलिसिटर जनरल आणि सीबीआय आधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे देखील आदेश दिले आहेत.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणी आपल्या कुटुंबासह रायबरेली तुरूंगात आपल्या काकाला भेटून परत येत असताना झालेल्या अपघातात पीडित तरुणी आणि वकिल गंभीर जखमी झाले आहेत. तर या अपघातात या पीडित तरुणीची आई, काकी आणि ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे, हा अपघात नव्हे घातपात असल्याचा आरोप देखील पीडित कुटुंबाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजपचा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत पीडित कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाला पत्र दिले होते. याच पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उत्तर प्रदेश राज्याबाहेर चालविण्याचे निर्देश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे चिन्हांचा प्रस्ताव सादर

Aprna

जिल्हाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

News Desk

Ayodhya Verdict : जाणून घ्या… कोण आहेत हे ३ मध्यस्थी जे काढतील तोडगा

News Desk