HW News Marathi
Covid-19

एक कोरोना रूग्ण सापडला तर बाजूची २० घरं सिल करणार,’या’ राज्याचा निर्णय!

उत्तर प्रदेश | देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाट्यावे वाढत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आलं आहे. तसेच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलायत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी करोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २० घरं कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जातील. ही २० घरं सील केली जातील. कोरोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ६० घरं सील केली जातील. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. शहरी भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यास २० घरं सील केली जातील आणि त्या भागाला कंटेनमेंट झोन असं जाहीर केलं जाणार आहे. एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास ६० घरं सील करुन त्यांना कंटेनमेंट झोन जाहीर केला जाणार आहे. या ठिकाणी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही किंवा तेथील कोणत्याही व्यक्तीला बाहेर येता येणार नाही. १४ दिवसांसाठी हे नियम लागू असतील, असं एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

इमारतींसाठी वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. एखाद्या इमारतीमध्ये एखाद्या मजल्यावर करोना रुग्ण आढळून आला तर संपूर्ण मजला सील केला जाईल. एखाद्या ठिकाणी एकाहून अधिक रुग्ण आढल्यास त्या इमारतीला कंटेनमेंट झोन जाहीर केलं जाईल. १४ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर कंटेनमेंट झोनमधून या इमारतींचं नाव हटवलं जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

अखेर ! चीनच्या हुबेई प्रांताने लाॅकडाऊननंतर आज घेतला मोकळा श्वास !

Arati More

ठाकरे सरकारने माफी मागून दंडाचे पैसे लोकांना परत करावेत !

News Desk