HW News Marathi
देश / विदेश

‘आप’च्या ३ खासदारांना सभापतींनी केले एकदिवसासाठी निलंबीत

नवी दिल्ली | आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होताना दिसत असून, राज्यसभेतही यांचे तीव्र पडसाद उमटले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकाकडून करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १५ वेळ राखून ठेवण्यावर एकमताने संमती झाली. मात्र, त्यापूर्वी ‘आप’च्या खासदारांनी राज्यसभेत घोषणा देत गोंधळ घातला. त्याच्यावर सभापतींनी कारवाई करत निलंबित केले आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून, शेतकरी आंदोलनाची धग आणखी वाढली आहे. आज सकाळी राज्यसभेत कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. त्यावरून सभागृहात बराच गदारोळ झाला. अखेर विरोधकांच्या मागणीची दखल घेत सभापतींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १५ तासांचा वेळ राखून ठेवला.

मात्र, ही चर्चा सुरू होण्यापूर्वी आपच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आप खासदारांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीन खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केलं. २५५ नियमानुसार सभापतींनी आपच्या तीन खासदारांवर कारवाई केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

Aprna

शोपियानमध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे’ – अरुण जेटली

News Desk