HW News Marathi
Covid-19

शरद पवार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने इराणमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी सुखरूप परतले..

दिल्ली | कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यातच इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतायचे होते. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची मोठी जबाबदारी भारत सरकारवर होती.मात्र या 224 जणांना मायदेशी परत आणण्यात भारत सरकारला यश आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसेच या  234 जणांमध्ये 131 विद्यार्थी आहेत असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी 44 प्रवाशांना इराणहून भारतात आणले गेले. त्यानंतर आतापर्यंत एकूण 234 भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आले आहे. यासाठी जयशंकर यांनी इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभारही मानले आहेत. इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे 100 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिथे गेलेले भारतीय हे मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. मात्र अखेर त्यांची ही चिंता मिटली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज पत्रकार परिषद

News Desk

Murlidhar Mohol HW Exclusive : पुण्यातील लॉकडाऊन वाढवायला हवा !

News Desk

हात जोडतो, दुखणी अंगावर काढू नका ! आरोग्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

News Desk