HW News Marathi
व्हिडीओ

Bachhu Kadu Strike in Mumbai | शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक ..

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी राजभवनावर मोर्चा काढला होता. राजभवनावर पोहचण्याअगोदरच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरक्षेचं कारण देत मोर्चा काढण्यापूर्वीच पोलिसांनी बच्चू कडू यांना नोटीस पाठवली होती. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र राजभवनावर पोहचण्यापूर्वीच मोर्चा अडवून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अडवल्यानंतर बच्चू कडू यांनी आयनॉक्स थिएटर मित्तल टॉवरसमोर आंदोलन केले. मोर्चात शेतकरी मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. सोयाबीन, सडलेले कांदे रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.#BacchuKadu #FarmersStrike #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्यंपाठोपाठ अमित ठाकरेंची होणार ग्रॅंड राजकीय एंट्री? मनसे काढणार सेनेचा वचपा

News Desk

मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? Uddhav Thackeray यांच्या विधानाचा अर्थ काय?

Manasi Devkar

“मनसेनं मला सभासद करून घेतलं म्हणून मी आभार मानतो”; Raj Thackeray यांची मिश्किल टिपण्णी

Manasi Devkar