HW News Marathi
व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ त्रिसूत्रीचा महाविकासआघाडीला झटका बसणार ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा बसलेला फटका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते शेतकऱ्यांशी विचारपूस करून नुकसानीचा आढावा घेत आहेत. तसेच रुग्णालयांना भेटी देऊन आरोग्य व्यवस्थेची माहितीही घेत आहेत. त्याशिवाय पक्षाच्या आमदार-खासदारांना भेटून पक्षबांधणीवरही चर्चा करत आहेत. एकाच दौऱ्यात देवेंद्र फडणवीस तीन तीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या त्रिसूत्री कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हे घराबाहेर पडून महाराष्ट्रभर फिरतात ,उद्धव ठाकरे मात्र फक्त मातोश्री पुरतेच अशी टीका सातत्याने होत असते. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व आले आहे.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #SharadPawar #RakshaKhadse #EknathKhadse #Bjp #Jalgaon #NCP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP ला युतीची Offer देणारे Purushottam Khedekar आहेत तरी कोण?

News Desk

पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk

Nitin Gadkari BJP | मी दिल्लीत खुश,देवेंद्रजी महाराष्ट्र सांभाळतील !

Arati More