HW News Marathi
व्हिडीओ

खडसे अन् महाजनांमधलं वाकयुद्ध संपेना!; Girish Mahajan म्हणाले, “खडसेंचं डोकं फिरलंय”

भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी, चौकशीसाठी पुण्याच्या कोथरूड पोलिसांचे पथक जळगावमध्ये दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात एकोणतीस पैकी नऊ जणांना मोका अंतर्गत कलम लावण्यात आल्याने या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात जळगावातील अ‌ॅड. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गिरीश महाजन यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याची टीका केली होती. एकनाथ खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं वक्तव्य केलं होतं. या टीकेला आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे.

#SharadPawar #GirishMahajan #EknathKhadse #BJPShivsena #BJP #NCP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गृहमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसलेत – Sanjay Raut

News Desk

दोन ‘भाऊ’ भेटणार तर शिवसेना-भाजपही जवळ येणार का?महाराष्ट्राचं राजकारण नवं वळण घेणार?

News Desk

Sanjay Raut नागपुरला वारंवार आल्यास त्यांना सद्बुद्धी येईल; Devendra Fadnavis यांचा टोला

News Desk