HW News Marathi
व्हिडीओ

Is Maharashtra heading towards President’s Rule ? | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला.त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दिवाळीमुळे चर्चेला उशीर झाला, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसंच येत्या एक-दोन दिवसात चर्चेला सुरुवात होईल, असंही त्यांनी सांगितलं. पाच वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.#President’sRule #SudhirMungantiwar #SanjayRaut #DevendraFadnavis #PulodGovernment #sharadPawar #MaharashtraGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Raj Thackeray यांचं टार्गेट आता ‘बारामती’

Manasi Devkar

Bacchu Kadu, Radhakrishna Vikhe Patil | विखे पाटलांवर बच्चू कडूंचा प्रहार

News Desk

मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष; Vinayak Raut यांची खरमरीत टीका

News Desk