HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांसाठी पंकजा मुंडे सरसावल्या…’या’ मुद्दयावर केली पाठराखण !

फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे सरकारनं जलयुक्त शिवारच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजपमधून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केली आहे. “जलयुक्त शिवार योजना ही अत्यंत चांगली आणि लोकहिताची आहे. सरकारने चौकशी लावावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, ही लोकांनी केलेली योजना आहे. तर बीड जिल्ह्यात लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे”, असा दावाही यावेळी पंकजांनी केला.
#PankajaMunde #DevendraFadnavis #UddhavThackeray #JalyuktShivar #JalyuktShivarYojana #JayantPatil #ThackerayGovernment #FadnavisGovernment #Maharashtra #MaharashtraFarmers #WaterIssue
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर आम्ही पुन्हा शेतकऱ्यांना ५ वर्षे वीज मोफत देऊ”; Chandrashekhar Bawankule यांचं वचन |

News Desk

सत्य समोर मांडणे हा पत्रकार अभिसार शर्मांचा गुन्हा आहे का ?

Atul Chavan

भाजपने मागच्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं ? Vishwajit Kadam यांचं सवाल

News Desk