HW News Marathi
व्हिडीओ

संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी, एल्गार रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मुंबईत तणावाचे वातावरण

भीमा-कोरेगाव हिंसाचारातील आरोपी संभाजी भिडेंना अटक करावी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीनं मुंबईत एल्गार रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली रॅली काढण्यात येणाऱ्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मिलिंद एकबोटेंना अटक झाली. परंतु त्यांसोबत आरोपी असलेले भिडे गुरुजी अद्याप मोकाट आहेत. जाहीरपणे कार्यक्रम करतायत, पत्रकार परिषद घेऊन आरोप करतायत परंतु पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नाही.

ही बाब सरकारला शोभणारी नाही, तरी त्यांना अटक करण्यासाठी भारिप बहुजन पक्षाच्या वतीने मुंबईत रॅली काढण्याचा ठरलेय. भिडे गुरुजींना तत्काळ अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केलीय.या रॅलीला परवानगी नाकारुन सरकार लोकशाहीचा गळा दाबत असल्याचा आरोप भारीप बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

याच दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने तणावाची परिस्थिती असल्याने यातून सरकारने ठोस कारवाई करावी अशी मागणी कऱण्यात आली आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर Hotel Taj President मध्ये BJP चा जल्लोष

News Desk

गोदरेजच्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस ‘काळा’ !

News Desk

Sanjay Raut थोड्याच वेळात नवा खुलासा करणार!; म्हणाले, “या…तुमची वाट बघतोय”

News Desk