HW News Marathi
व्हिडीओ

कोणाच्या पाठीत कोणाचा खंजीर?, बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात शरद पवारांवर गंभीर आरोप

“शरद पवार हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ‘स्वयंघोषित मानसपुत्र’ होते. सत्तेसाठी काहीही करण्याची पवारांची तयारी होती”, अशी घणाघाती टीका पद्मभूषण, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्रात केली आहे. बाळासाहेब विखे पाटील यांचे हे आत्मचरित्र राजकिय वर्तुळात खळबळ उडवून देणारं आहे.
विखे-पवार यांच्यातील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. “१९८० नंतर यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वजन घटले, अशी चर्चा पसरविण्यामध्ये देखील शरद पवार यांचाच वाटा होता”, असा गंभीर आरोपही बाळासाहेब विखे यांनी यात केला आहे. “शरद पवारांमधील राजकारण्याने त्यांच्या गुणांवर मात केली”, अशीही टीका यात बाळासाहेब विखेंनी केली आहे.
#SharadPawar #BalasahebVikhePatil #YashwantraoChavan #NCP #Congress #VikhePatilPawar #Maharashtra #Politics
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना, Sambhaji Raje Chhatrapati यांच्याकडून मोठी घोषणा

News Desk

शिंदे गटात गेल्यानंतरही आढळराव पाटलांची गोचीच

Manasi Devkar

Bhagwat karad येताच Pankaja Munde समर्थकांनी सुरु केला राडा…

News Desk