HW News Marathi
व्हिडीओ

दिल्लीतील शांततापूर्ण शेतकरी आंदोलनाला हिंसक स्वरूप ! जबाबदार कोण ?

देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला अत्यंत हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. दिल्लीतील हे आंदोलक शेतकरी थेट लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावर आपल्या शेतकरी संघटनेचे झेंडा फडकवला आहे. शेतकऱ्यांकडून हा अत्यंत आक्रमक असा पवित्रा इथे घेण्यात आला आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीत दिसलेले हे चित्र अत्यंत दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत. गेल्या तब्बल ६० दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आणि मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले शेतकऱ्यांचे हे आंदोलन इतके हिंसक आणि आक्रमक का झाले ? काही समाजविघातक वृत्तीमुळे हे झालं का ?ह्याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या काही दिवसांपासून सरकारशी चर्चा करणारे ४० शेतकरी नेते कुठे आहेत?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतक्या प्रचंड जमावाच्या आक्रमकतेपुढे पोलीसच नव्हे तर हे शेतकरी नेतेही हतबल झाल्याचे चित्र आहे.

#FarmersProtests #RedFort #TractorRally #NarendraModi #ModiGovernment #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“त्या उदय सामंतांच्या मागे फिरून काय मिळणार?”, नितेश राणेंनी अधिकाऱ्याला झापलं

News Desk

“27 नोव्हेंबरला राज ठाकरे सगळ्यांचा हिशोब करणार”

News Desk

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाइन करा! राजू शेट्टींची मागणी

News Desk