HW News Marathi
राजकारण

पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे आणि पार्थ पवार कोणतीही चुकीचे पाऊल उचलणार नाहीत – राजेश टोपे

जालना | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येवरुन केलेल्या मागणीवरून फटकारल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हे नक्की काय भूमिका घेणार, याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पक्षातील संघर्षाबद्दल भाष्य केले आहे.’पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब असून सर्वकाही व्यवस्थित होणारच आहे. पवार कुटुंबियांशी माझे दोन पिढीचे कौटुंबिक संबंध आहेत. पार्थ पवार माझे चांगले मित्र आहेत ते काहीच चुकीचे पाऊल उचलणार नाहीत,’ असा विश्वास राजेश टोपेल यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही पवार कुटुंबात सगळं नीट आहे कोणीही नाराज नाही अशी माहिती दिली होती.

शरद पवार यांच्या विधानानंतर अजित पवार, पार्थ पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, आज (१५ ऑगस्ट) अजित पवार कुटुंबासहीत बारामतीत त्यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्याकडे जाणार होते. मात्र, आता अजित पवार जाणार नाहीत अशी माहिती श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी पत्रकारांवर माहिती दिली. तसेच, पार्थ पवार नेहमीप्रमाणे जेवायला काकडीकडे जाणार असल्याची माहितीपट मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अवनी वाघिणीच्या क्रूर हत्येमुळे मला दुःख झाले !

swarit

मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोग | सचिन सावंत

News Desk

सवर्णांना मिळणाऱ्या १० टक्के आरक्षणाच्या विधेयकावर सायंकाळी चर्चा

News Desk