HW News Marathi
राजकारण

राज्याच्या आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकांना १० हजार रुपये मानधन दया !

मुंबई | कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा दयावा आणि राज्याच्या आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकांना १२०० रुपयांऐवजी १० हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

सेवानिवृत्त कोतवाल आणि दिवंगत कोतवालाच्या विधवा पत्नींना निर्वाहभत्ता मिळावा या मागणीसाठी आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याच्याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा तशी सूचना सरकारला करावी, असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करणाऱ्या या महिलांचे मानधन वाढवण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले आहे. रोजंदारीवर गेलेल्या महिलेला दिवसाला २५० ते ३०० रुपये मिळतात त्यामुळे किमान वेतनाचा नियम मानधनासाठी लागू करावा आणि तसे निर्देश सरकारला दयावेत, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

राज्यातील आरोग्य उपकेंद्रामध्ये सुमारे १० हजार ५०० महिला परिचालक १९६६ पासून सेवा देत आहेत. त्यांना सरकार महिना १२०० रुपये मानधन देते. या महिलांपैकी जवळपास हजार दीड हजार महिला या सहाय्यक परिचारक म्हणून पूर्णवेळ परिचालकांसोबत सेवा देत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारच्या दौ-यावर

News Desk

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk

बौद्धवाड्याची मर्यादा ओलांडून रिपब्लिकन पक्षाची शाखा गावात स्थापन करा

News Desk