HW News Marathi
राजकारण

आबा माझ्यासाठी प्रेरणादायी होते | मुनगंटीवार

सांगली | आर. आर. पाटील(आबा)चे स्मारक १६ मार्च २०२० पर्यंतपूर्ण होईल. तेव्हा स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेन, असे धाडसी विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आबामुळेच मी अशी धाडसी विधाने करु शकतो असे देखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले. मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यार्थी वसतीगृहाच्या आवारातील नियोजित आर. आर. पाटील स्मृती स्मारकाच्या भूमीपुजन प्रसंगी ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध पक्षातील मान्यवर राजकीय नेते मंडळी यानिमित्ताने एका व्यासपीठावर आली. सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून आबांचे स्मारक होणार आहे.

मुनगंटीवार यांनी आबांसोबतचे विधीमंडळातील अनेक आठवणी श्रोत्यांसमोर उघड करताना आपले मैत्रीचे नाते उलगडले. ते म्हणाले, ” मी नवखा आमदार म्हणून विधानसभेच्या ग्रंथालयात गेल्यानंतर गेल्या पाच वर्षातील कुणाची भाषणे मी वाचू असा प्रश्‍न मी ग्रंथपाल बाबा वाघमारे यांना केला, तेव्हा त्यांनी मला आबांचे भाषण वाचायला सांगितले.” त्याअर्थाने आबा माझ्यासाठी प्रेरणादायी होते. युतीचा आमदार म्हणून १९९५ च्या विधानसभेत पहिले भाषण केले. त्यानंतर “तुम्ही चांगले भाषण केलेत. तुमचा भविष्यकाळ उज्वल आहे.’ असे पत्र त्यांनी मला आवर्जून पाठवले. एक संवेदनशील राजकारणी म्हणून मी त्यांना अनुभवत होतो. विधानसभेत मी ९ डिसेंबर २००९ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाच्या व्यथांवर बोलताना केवळ भाषणे करून नक्षलवाद संपणार नाही, असे मी आबावर टिका केली आहे.

या भाषणात मी त्यांना गडचिरोलीचे पालकमंत्री व्हा असे आव्हान दिले. एका विरोधी आमदाराच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी विधीमंडळात आपण पालकमंत्री होत आहोत अशी घोषणा केली. गडचिरोलीच्या विकासासाठी ते मंत्रीमंडळ बैठकीत कायम आग्रही राहिले, त्यासाठी त्यांनी अंगावर वाद ओढवून घेतले. डान्सबार बंदीचा निर्णय असो, वा स्वच्छता अभियानाचा. आर. आर. यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. ते मला नेहमी म्हणायचे की तुम्ही आमच्या पक्षात हवे होता. मीही त्यांनी माझ्या पक्षात येण्याचे आवाहन करायचो. हे खरे होते की, त्यांनी कधीही पक्ष बदलला नसता आणि मी देखील दिल्लीने कितीही अन्याय केला तरी पक्ष बदलणार नाही. कोणताच पक्ष वाईट नाही, मात्र प्रत्येक पक्षात चांगल्या माणसांसाठी जागा मात्र असली पाहिजे.

राजकारणाबद्दलचा समाजाचा झालेला दृष्टीकोन बदलण्यासाठी ते झाले पाहिजे. ” जयंत पाटील म्हणाले, आर. आर. यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरवात केली. त्याचवेळी त्यांनी तासगाव मतदारसंघावर छाप टाकली. देशात स्वच्छता अभियान राबविण्याचे काम पहिले त्यांनी केले. विरोधात असताना त्यांच्याकडे कधी विधानसभेत पद नव्हते मात्र तेच विरोधी पक्षनेते होते. सत्तेत राहूनही त्यांनी नेहमीच जनतेचीच भूमिका मांडली. सत्तेतही त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे लोकांसाठी सोने केले. त्यांच्या निधनाने राष्टवादी कॉंग्रेसची मोठी हानी झाली याचे मोठे शल्य मला आहे. ”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी तुमच्या पापाचा घडा भरला आहे | नवाब मलिक

News Desk

माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू !

News Desk

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna