HW News Marathi
राजकारण

संघ सोडल्यानंतर ख्रिश्चनांबाबत सुभाष वेलिंगकरांची मवाळ भूमिका

गोवा। “मी कधीही ख्रिश्चनविरोधी नव्हतो. मी ख्रिश्चन समाजाविरुद्ध काहीच बोललो नाही आणि हिंदू व ख्रिश्चनांचा डीएनए एकसमान आहे”, असे गोव्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे. “हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन असा भेदभाव मी कधीही केलेला नसून सर्वच समान आहेत”, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. “मी ख्रिश्चन बांधवांशी संपर्क साधून त्यांच्या मनात काही गैरसमज असतील तर दूर करीन”, असे सुद्धा सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडल्यानंतर ख्रिश्चनांच्या संदर्भातली वेलिंगकरांची भूमिका मवाळ झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोव्याच्या प्रमुखपदावर असलेल्या वेलिंगकरांनी २०१६ मध्ये संघाला सोडचिठ्ठी दिली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घेतलेला चर्चशी संबंधित कॉन्वेंट शाळांना अनुदान सुरू ठेवण्याच्या निर्णयाला वेलिंगकर यांचा विरोध होता. या मतभेदातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला होता. तसेच अल्पसंख्याकांची हुजरेगिरी करण्याचे पर्रीकरांचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सुभाष वेलिंगकर यांनी ‘गोवा सुरक्षा मंच’ या पक्षात नुकताच प्रवेश केला असून राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. मांद्रेम इथल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत वेलिंगकर गोवा सुरक्षा मंचाच्या तिकिटावर उतरतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राफेलसंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधींनी देशाची माफी मागावी !

News Desk

…मग पाटीदारांना आरक्षण का नाही ?

News Desk

समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk
देश / विदेश

कोणी घर देता का घर !

News Desk

बिलासपूर | कोणी घर देत का घर… असा नटसम्राट या प्रसिद्ध मराठी नाटकातील हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच परंतु आता खऱ्या आयुष्यात देखील असे म्हणण्याची वेळ बिलासपूरमधील एका ६० वर्षीय महिलेवर आली आहे. या महिलेने आपले घर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले. या योजनेसाठी महिलेने काही पैसे सुद्धा भरले होते. परंतु, अद्याप तिला घर भेटले नाही. त्यामुळे सध्या या महिलेला कच्च्या घरात राहावे लागत आहे.

या महिलेने घरासाठी ८० हजार रुपयांचा हप्ता सुद्धा भरला आहे. तिला अद्याप घर भेटले नाही. यासंबंधीच्या अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले. परंतु त्यांनी यावर चर्चा करण्याचे टाळले. त्यामुळे आता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली आहे, असे या गावच्या सरपंचानी सांगितले. तर, तक्रारदार महिला म्हणाली की, सरकारी अधिकाऱ्यांनी माझे घर चोरी केले आहे. वाटप करण्यात आलेल्या घरांसाठी मी पैसे सुद्धा भरले आहेत. मात्र, मला अद्याप घर मिळाले नाही.

Related posts

#Article370Abolished : तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह मुंबई-पुण्याहून ८१ डॉक्टरांची टीम केरळला रवाना

swarit

कॉमनवेल्थ गेम्समधील महिला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक

News Desk