HW News Marathi
राजकारण

अहमदनगर-नाशिकवर अन्याय होऊ देणार नाही !

जालना | अहमदनगर व नाशिक जिल्ह्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ‘अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आहे. त्यामुळे ते पाणी रोखण्यात येणार नाही,’ अशी विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते जालना येथे बोलत होते. यावेळी विरोधकांना सुनावत पाणी प्रश्‍नावर विरोधकांनी राजकारण करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री काल (शनिवार) जालना येथे दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जायकवाडी धरणात भाजप सरकारच्या काळातच पाणी सोडण्यात आले आहे. मराठवाड्याला हक्‍काचे पाणी देतानाच नाशिक व नगर जिल्ह्यातील नागरिकांवरही अन्याय होऊ देणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घाबरु नका मी, काय छोले भटूरे खाणार नाही | मुख्यमंत्री

News Desk

“राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल,” फडणवीसांचा पुन्हा एकदा दावा

Aprna

नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण, विरोधकांनी ‘डार्क डे’ म्हणून केला निषेध

News Desk