HW News Marathi
राजकारण

शेताच्या बांधावर जाऊन अजितदादांचा शेतक-यांशी वन टू वन

परभणी ( सेलू ) | राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत केवळ सभांच्या माध्यमातून नव्हे तर विविध माध्यमातून नेते शेतक-यांशी संवाद साधत असून आज तर शेतक-यांच्या बांधावर जाऊन हुरडा खात संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून जात आहे.

हल्लाबोल यात्रेचा आजच्या आठव्या दिवशी परभणी जिल्ह्यात पाथरी, सेलू येथे सभा होत आहे. हल्लाबोलच्या पहिल्या सभेपासून राष्ट्रवादीचे सर्व नेते शेतकऱ्यांचे प्रश्नांना वाचा फोडत आहेत. पण आज अजितदादा यांनी थेट शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन शेतकर्याशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हुरडा खाऊ घालत शेतकर्‍यांनी अजितदादा, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांचे स्वागत केले.

सध्या शेतकऱ्यांवर बोंड अळी, कर्जमाफी, हमीभाव, भरमसाठ वीज बिल वसुली… अशा नाना अडचणी सतावत आहेत. या प्रश्नावर आज संवाद साधला. अजितदादा, तटकरे, मुंडे व इतर नेते सरकारवर तुटून पडत आहेत. पण त्याचवेळी तुटून पडलेल्या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी थेट बांधावर जाऊन त्याला दिलासा देत असल्याचे चित्र यावेळी पाथरी येथे पाहायला मिळाले. सेलूचे आ. विजय भांबळे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे उपस्थित होते. या नेत्यांच्या संवादामुळे शेतकरी वर्ग आनंदून गेला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव

Aprna

उद्धव ठाकरे अन् माझ्यात कोणतीही भिंत नाही !

News Desk

हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही !

News Desk
मुंबई

मंत्रालयात ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यानी केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

मुंबई | ७० वर्षीय वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी सोमवारी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. पाटील यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. धुळे जिल्ह्यातील होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात धर्मा पाटील यांची शेत जमीन गेली असून त्याच्या जमीनीला योग्य भाव न मिळाल्याने त्यांनी हे पाऊन उचल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकल्पात शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन गेली असून सरकारने पाच एकरच्या बदल्यात त्यांना चार लाख रुपये भरपाई देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पण, या प्रकल्पा संबंधित अधिकारी आणि मंत्रालयाकडून योग्य ते उत्तर मिळत नसल्यामुळे विष प्राशन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या घटनेनंतर धुळ्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मंत्र्यांनी धर्मा पाटील यांची भेट घेतली नाही.

तसेच धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत ६०० आंब्याची झाडे आणि विहीर अशी बागायती जमीन प्रकल्पात गेली आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला असून इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत पाटील यांना कमी मोबदला मिळाला असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. तीन महिन्यापासून पाटील याचा पाठपुरावा करत असून मंत्र्यांनी यावर कोणताच प्रतिसाद न दिल्यामुळे हताश होऊन धर्मा पाटील यांनी विष पिण्याचा निर्णय घेतला.

Related posts

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

swarit

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना धमक्यांचे फोन

News Desk

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

News Desk