HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी देशातील जनतेची माफी मागावी !

मुंबई | रमाकांत आचरेकरसरांना भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनानंतर सरकारची जबाबदारी होती की,सरकारने त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करायला हवे होते परंतु तसे न केल्याने सरकारचा खरा चेहरा समोर आलाय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

रमाकांत आचरेकरसर क्रिकेटचे महान कोच होते. त्यांनी सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळीसारखे महान खेळाडू या देशाला दिले आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

अभिनेत्री श्रीदेवीचे निधन झाले त्यावेळी मुख्यमंत्री धावतधावत पोचले होते.संपूर्ण भाजप त्यावेळी सक्रिय झाली होती. परंतु आचरेकरसर हे व्यक्ती महान होते त्यांचा अधिकार होता की संपूर्ण शासकीय इंतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हायला हवे होते. परंतु भाजप सरकार हेच विसरली आहे. या मोठया चुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

साईबाबा पावले! सिंचन योजनेसाठी शिर्डी ट्रस्टची राज्य सरकारला मदत

News Desk

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी होऊ शकतो राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार

News Desk