HW News Marathi
राजकारण

भाजपचा राम मंदिराचा मुद्दा हा केवळ एक जुमला | उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा एका भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ‘प्रत्येकाच्या खात्यामधे १५ लाख रुपये जमा केले जातील हे एक प्रकारचे खोटे आश्वासन होते. त्याचप्रमाणे राम मंदिराचा मुद्दा हा देखील भाजपचा केवळ एक जुमला आहे’, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होताना पाहायला मिळत आहे. ‘राम मंदिराचा मुद्दा हा केवळ निवडणुकांपुरताच उचलला जातो. त्यानंतर भाजपला त्याचा विसर पडतो. मात्र, जेव्हा राम मंदिराचा मुद्दा उचलला जातो तेव्हा आपण याची खात्री करून घ्यायला हवी कि राम मंदिर खरोखरच बांधण्यात येईल’, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येकाच्या खात्यामधे १५ लाख रुपये जमा केले जातील, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्या घोषणेची अंमलबजावणी अद्यापही झालेलीच नाही. तो केवळ मत मिळवण्यासाठीचा एक जुमला होता. त्याप्रमाणेच अयोध्येत राम मंदिर बांधणे हा सुद्धा भाजप सरकारसाठी केवळ एक मत मिळविण्यासाठीचा जुमला असल्याचे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून…”, सदा सरवणकरांचा शिवसेनेवर आरोप

Aprna

अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या किंकाळ्याच

News Desk

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; होणार थेट प्रक्षेपण

Aprna