HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशात सशस्त्र पोलीस बंदोबस्तात खत पुरवठा

नवी दिल्ली | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शपथ घेताच तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असली तरी या शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप कमी झालेल्या नाहीत. मध्य प्रदेशमध्ये शेतीसाठी खताची टंचाई असल्याने या शेतकऱ्यांना चक्क सशस्त्र पोलीस बंदोबस्तात केवळ ६ केंद्रांतून खत पुरवठा करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी तेथील वातावरण अनुकुल असल्याने मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र मध्य प्रदेशात तीन लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता असताना त्याहून निम्मा म्हणजेच केवळ १.३४ लाख मेट्रीक टन खताचा पुरवठा केला गेला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात युरियाचा पुरवठा करण्यात आला नाही तर परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे.

विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मध्य प्रदेशमधील खताच्या अपुऱ्या प्रमाणाची बाब लक्षात आली असूनही विधानसभा निवडणुकांमध्ये गुंतलेल्या मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे देखील म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“गेल्या अडीच वर्षात ‘मविआ’ सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना,” एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Aprna

आपच्या अतिशी यांचा गौतमवर ‘गंभीर’ आरोप

News Desk

आज पंतप्रधान मोदींची मुंबईत तर शरद पवारांची ठाण्यात प्रचार सभा

News Desk
राजकारण

काँग्रेसच लढविणार पुणे मतदार संघ

News Desk

पुणे | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कारण या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु खुद्द पवारांनी पुण्यातून उभे राहणार असे स्पष्ट केल्यावर या चर्चेला पूर्णविराम लागला. त्यामुळे सुरुवातीपासून काँग्रेसकडे असणारी ही जागा राखण्यात अखेर काँग्रेसला यश आले असले तरी या जागेसाठी नक्की कोण उमेदवार असणार याबाबत मात्र काँग्रेसने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादीला पुण्याची लोकसभा लढवण्यात रस असल्याचा बॉम्ब टाकला आणि पुण्यातील आघाडीत एकप्रकारे भेग पडली. त्यावेळी काँग्रेसने परंतु कुठल्याही परिस्थितीत पुण्याची जागा सोडणार नसल्याचे सांगितले होते. तसेच सुरु असलेल्या आघाडीच्या जागा वाटप चर्चेत पुण्याची जागा राखण्यात काँग्रेसला यश आल्याचे समजते. अर्थात जागा राखली तरी जागा जिंकणे तितकेसे सोपे नसून भाजप विरोधात दमदार प्रतिस्पर्धी उमेदवार उभे करण्याचे काँग्रेससमोर आव्हान असणार आहे. सध्या तरी काँग्रेसमधून अनंत गाडगीळ यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असून आगामी काळात इतर नावेही पुढे येण्याची शक्यता

Related posts

‘ते’ राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे !

News Desk

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार !

News Desk

योगी आदित्यनाथ यांची ओवेसींना धमकी ?

News Desk