HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशात सशस्त्र पोलीस बंदोबस्तात खत पुरवठा

नवी दिल्ली | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शपथ घेताच तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असली तरी या शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप कमी झालेल्या नाहीत. मध्य प्रदेशमध्ये शेतीसाठी खताची टंचाई असल्याने या शेतकऱ्यांना चक्क सशस्त्र पोलीस बंदोबस्तात केवळ ६ केंद्रांतून खत पुरवठा करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी तेथील वातावरण अनुकुल असल्याने मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र मध्य प्रदेशात तीन लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता असताना त्याहून निम्मा म्हणजेच केवळ १.३४ लाख मेट्रीक टन खताचा पुरवठा केला गेला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात युरियाचा पुरवठा करण्यात आला नाही तर परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे.

विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मध्य प्रदेशमधील खताच्या अपुऱ्या प्रमाणाची बाब लक्षात आली असूनही विधानसभा निवडणुकांमध्ये गुंतलेल्या मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे देखील म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या जाहीरसभेत भाजपच्या एका मंत्र्यांकडून महिला मंत्र्यांचा विनयभंग

News Desk

भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

News Desk

विरोधी पक्ष ‘मोदी हटाव’चे नारे देण्यात तर मी लोकहिताचे निर्णय घेण्यात व्यस्त !

News Desk