HW News Marathi
राजकारण

अशोक चव्हाण यांचा दावा खोटा, विधानसभा बरखास्त होणार नाही !

मुंबई | “भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी केली असून येत्या २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. ही भाजपची रणनीती आहे. अशा प्रकारे धक्का देऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा विचार आहे”, असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. परंतु, अशोक चव्हाण यांचा हा दावा खोटा असल्याचे मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

अशोक चव्हाण यांचा हा पूर्णपणे खोटा आहे. राज्यातील सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत आहे. म्हणूनच विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे वक्तव्य करण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…मुंबई उत्तर मतदारसंघाबाबत

News Desk

कोणत्याही पक्षाचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत !

News Desk

लोकांच्या मनात सत्ता परिवर्तनाची चाहुल !

News Desk