HW News Marathi
राजकारण

भारतरत्न हा केवळ सवर्ण,  ब्राह्मणांचा क्लब !

नवी दिल्ली | एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारतरत्न पुरस्कारावरून सरकारला लक्ष्य केले आहे. “इतिहास पाहता भारतरत्न हा केवळ सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओवेसी बोलत होते.

“इतिहास पहिला तर भारतरत्न हा केवळ सवर्णांच्या क्लब असल्याचे तुमच्या लक्षात येईल, असे ओवेसी म्हणाले. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना पारदर्शकता पाळली जात नाही. भारतरत्न जाहीर झालेल्या दीन दयाळ उपाध्याय यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत”, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. नुकताच सरकारकडून माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या तीन जणांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. यावरून अनेक स्तरातून सरकारवर टीका करण्यात आली होती.

ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी देखील भारतरत्न पुरस्कारावरून प्रश्न उपस्थित केला होता. “आतापर्यंत किती दलित, आदिवासी, मुस्लिमांना भारतरत्न देण्यात आला ?”, असे विचारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मनापासून भारतरत्न देण्यात आला नाही, असे ओवेसी यांनी म्हटले. सरकारला गरज वाटली म्हणून त्यांनी आंबेडकर यांना या पुरस्काराने सन्मानित केले, अस आरोपही यावेळी ओवेसींनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आजी, माजी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

News Desk

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

Aprna

राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली ?, अमित शहांचा सवाल

News Desk