HW News Marathi
राजकारण

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली । आम आदमी पक्षाच्या २७ आमदारांवर रुग्ण कल्याण समितीवरून लाभ होत आहे, असा आरोप करण्यात आला होता. तो आरोप आता निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला आहे. या निर्णयामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा शिक्कामोर्तब केले आहे.

यामुळे आता २७ आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार बाजूला झाली आहे. या प्रकरणात विभोर आनंद यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी आपल्या याचिकेमध्ये २७ आमदारांकडे रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्षपद असल्याने ते लाभाचे पद असल्याचा आक्षेप घेतला होता. रुग्ण कल्याण समिती ही स्वयंसेवी संस्थेप्रमाणे काम करत असते व त्यांचा थेट रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क असतो. निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात आम आदमी पक्षाला दिलासा मिळाला असला तरी, अजून २० आमदारांवर सचिव लाभ पदावरून अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणाची सुनावणी सुद्धा निवडणूक आयोगाकडेच सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालिकांचा वापर करून छुपा प्रचार करण्याचे भाजपचे मायावी तंत्र, काँग्रेसचा आरोप

News Desk

रामदास आठवले हे प्रामाणिक कार्यकर्ते | राजा ढाले

News Desk

दक्षित मुंबईतून कोळंबकरांचा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना जाहीर पाठिंबा

News Desk