HW News Marathi
राजकारण

भाजपच्या शेवटाची सुरूवात, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मुंबई | गोरखपूरच्या पोटनिवडणुकीने अहंकार व उन्मत्तपणाचा पराभव केला आहे. भारतीय जनता पक्षाला हवेतून खाली आपटणारे हे निकाल आहेत. ही तर खरी मोदींच्या सत्तेच्या अंताची सुरूवात आहे. मित्रांना दूर लोटले व खोटय़ाचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात.

कोसळणे सुरू होते तेव्हा कोणतेही चाणक्य पडझड रोखू शकत नाहीत. 2019 साली भाजपचा आकडा 280 राहणार नाही तर किमान 100 ते 110 जागांची घसरगुंडी होऊन त्या 170 पर्यंत खाली येतील असे भाकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तविले आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकीचे निकाल बुधवारी आले. यात भाजपचा दारूण पराभव झाला. फुलपूर आणि अरिरिया लोकसभा मतदारसंघात तर भाजपचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला तर गोरखपूरची जागा 29 वर्षानंतर 22 हजार मतांनी गमावली.

अखिलेश यादव, मायावती आणि लालूप्रसाद यांनी मोदी-शहांच्या भाजपला चांगलाच झटका दिला आहे. सध्या याची देशभर चर्चा असताना भाजपचा मित्रपक्ष असलेला, राहिलेल्या शिवसेनेने त्यांना झोडपण्याची संधी सोडली नाही. सामनात अग्रलेख लिहून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘शिवसेनेची अयोध्येत कितीशी ताकद आहे ?’

Gauri Tilekar

दानवे-खोतकरांच्या वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

News Desk

पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर ठेवा !

Gauri Tilekar
महाराष्ट्र

संभाजी भिडेंना २६ मार्चपर्यंत अटक करण्याचे अल्टिमेटम

News Desk

मुंबई | भिमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडें यांना २६ मार्चपर्यंत अटक करण्याचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. अटक न झाल्यास विधानभवनात धडक मोर्चा काढण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे. पण, संभाजी भिडें यांना अजूनही ते मोकाट आहेत. भिमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी सभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची महत्त्वाची भूमिका होती. भिमा-कोरेगाव येथील विजयस्तभला १ जानेवारी रोजी शौर्य दिन म्हणून अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायी येथे गेले होती. सणसवाडी येथे दीड ते दोन हजार जमावाने हल्ला केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. या दोघांनी जमावाला चिथावल्याचा आरोप आहे.

Related posts

संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा, या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका, तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू, मातोश्रीवरून आदेश 

News Desk

अजित पवारांचा बांध फूटला, शरद पवारांची बदनामी झाली म्हणून राजीनामा !

News Desk