HW News Marathi
राजकारण

लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने ३ राज्यात भाजपने पराभव करुन घेतला ?

मुंबई | “मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता असतानाही काँग्रेसने विजय मिळवला. मात्र, लोकसभा निवडणुकांमध्ये त्याच ठिकाणी भाजपला मोठे यश मिळाले. देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर भाजपने हा पराभव घडवून तर आणला नाही ना ?”, अशी शंका आपल्या मनात निर्माण झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शनिवारी (१ जून) झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी याबाबत ट्विट करत आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.

“ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती”, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी असे ट्विट करत पुन्हा एकदा ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

HW Exclusive | पंतप्रधानांपेक्षा मला प्रज्ञा ठाकूर जास्त आदर्श वाटतात !

News Desk

लोकसभेच्या २ महिन्यांपूर्वीच अर्जुन खोतकर अन् आमच्यात सेटलमेंट झाली होती !

News Desk

शिवसेना २०१९ ची निवडणूक ‘स्वबळावर लढणार’

News Desk