HW News Marathi
राजकारण

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपला वरचढ ठरणार ?

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांच्या निकालांबाबत टाइम्स नाऊ-व्हीएमआरने केलेल्या सर्व्हेनुसार भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातल्या एकूण १३१ लोकसभा जागांपैकी भाजपला केवळ १७ जागा मिळणार असल्याची शक्यता या सर्व्हेतून वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या तुलनेत यंदा काँग्रेसला दक्षिण भारतात चौपट जागा (७१) मिळणार असल्याचे या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे.

३९ लोकसभा जागा असणाऱ्या तामिळनाडूमध्ये जर आताच्या घडीला निवडणूक झाल्या तर यूपीएला ३९ पैकी तब्बल ३५ जागांवर दणदणीत विजय मिळेल तर एआयएडीएमकेला उर्वरित ४ जागा मिळतील, असे या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे. तर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेला ३७ जागा मिळाल्या होत्या त्यांना आगामी निवडणुकांमध्ये आता ४ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे.

केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागा आहेत. जर आता निवडणुका झाल्या तर भाजप खातं उघडू शकेल त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला १६ तर कम्युनिस्टांना ३ जागा मिळतील. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत यूडीएफला १२ तर एलडीएफला ८ जागा मिळाल्या होत्या.

लोकसभेच्या २५ जागा असणाऱ्या आंध्र प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली तर वायएसआर काँग्रेसला २३ जागांवर विजय मिळेल. टीडीपीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागेल. तर भाजप आणि काँग्रेसला खाते उघडणेही कठीण होणार आहे. दरम्यान, २०१४ च्या निवडणुकांमध्ये टीडीपीला १५ तर वायएसआर काँग्रेसला ८ तर भाजपला केवळ २ जागा मिळाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमधून गडकरी बाहेर तर फडणवीसांना स्थान

Aprna

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हीच गोड बातमी !

News Desk