HW News Marathi
राजकारण

आता धनगर आरक्षणावरून सरकारची कोंडी ?

मुंबई | मराठा आरक्षणाचे विधेयक आज अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. या दोन्ही सभागृहात विरोधकांकडून मराठा आरक्षणाच्या या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. आता मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारची कोंडी करण्याचा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन ३ महिने होऊनही सरकारने यावर अद्याप एटीआर आणला का नाही ?, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहेत, त्या पद्धतीचा हा धनगर आरक्षणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातील काही बाबींची पूर्तता करून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला देखील आरक्षण देण्यात येईल. आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही धनगर आरक्षणाचा एटीआर आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत सादर करु, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

Aprna

“कागदावर शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळाले, पण…”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna

कर्नाटकातील मंत्रिमंडळाचा विस्तार, १७ मंत्र्यांनी घेतली शपथ

News Desk