HW News Marathi
राजकारण

“चुकून पण इथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर…”, नितेश राणेंची ग्रामस्थाना धमकी

मुंबई | “चुकून पण इथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही. तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही”, अशी धमकी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ग्रामस्थाना दिली आहे. नितेश राणे हे कणकवलीमधील नांदगाव येते बोलताना ग्रामस्थान धमकी दिल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, दोडामार्ग , कणकवली , कुडाळ, मालवण सावंतवाडी , वैभववाडी आणि वेंगुर्ला या तालुक्यात ग्रामंपचायतीच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना नितेश राणेंनी ग्रामस्थाना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

नितेश राणे म्हणाले, “जे गाव मला माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्याच गावाचा विकास मी करेन नाही तर मी करणार नाही. आपण लपाछूपी वाले नाही. राणेसाहेबांच्या तालमीत तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक आणि ओढात एक असे नाही. चुकून पण इथे माझ्या विचारांचा सरपंच आलेला नाही. तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही. ऐवढी काळजी तर मी निश्चित पणे घेईन. मग आता तुम्ही धमकी समजा काही समजा आपले कॅलक्यू लेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना लक्ष्यात ठेवा. सगळी निधी आता माझ्या हाता आहे. जिल्हा नियोजन निधी, ग्रामविकासची निधी, 25-15ची निधी असो, केंद्र सरकारची निधी असो, मी सत्तेत असलेला आमदार आहे”, असा इशाराही त्यांनी दिला. नितेश राणे पुढे म्हणाले, “म्हणून पालमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असतील. हे कोणीही मला विचारल्या शिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. त्यामुळे हा विषय तुम्ही स्पष्ट समजून घ्या. अगर नितेश राणेंच्या विचारांचा सरपंच आलेला नाही. तर इथे विकास होणार नाही. निधी येणार नाही, हे सरळ स्पष्ट आहे.”

 

आपल्या विचारांचा सरपंच असणे फार गरजेचे

 

“लोक बोलत आहेत की, लोकप्रिय उमेदवार आहेत. स्वच्छ, महनती उमेदवार, महनती कार्यकर्ता आहे. तो सरपंचपदावर बसला तर नक्की सरपंचपदाला न्याय देईल, असा आमचा सहकारी म्हणून तुम्हाला तिथे सरपंच म्हणून तिथे दिलेला आहे. तुमच्यासमोर नामधारी पुतळा उभा केलेला नाही. किंवा दगड दिलेला नाही. दगड दिला मतदान करा, असे नाही. असा उमेदवार दिलेला आहे. जो तुमच्या गावाचा विकास करेल. माझ्याशी बोलले, माझ्याशी चर्चा करेल, लागल तर राणेसाहेब केंद्र सरकारचे मंत्री म्हणून तिथे बसलेले आहेत. त्यांच्याशी बोलले, रवी चव्हाण जे पालकमंत्री आहेत. त्यांच्याशी बोलतील आणि अशा पद्धतीने तुमच्या गावाचा विकास करेल. कारण आपले नांदगाव हे हावेला लगत असलेले गाव आहे. आगामी काळात रस्त्याच्या दोन्ही बाजूने अजून रस्ते बनतिली. आणि दोन्ही बाजूने विकास होईल, तेव्हा इथे आपल्या विचारांचा सरपंच असणे फार गरजेचे आहे. म्हणून या गोष्टी आपण मतदार आणि कार्यकर्ते म्हणून लोकांपर्यंत पोहोचवावा. म्हणून तुम्हाला सांगतिले. आणि शेवटाचा आणि महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला एकद आणि एकद स्पष्ट करतो.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

सेनेकडून खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रिपदाची शपथ | संजय राऊत

News Desk

शरद पवार हे फिल्डवरचे नेते !

News Desk