HW News Marathi
राजकारण

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटीची ऑफर | कुमारस्वामी 

बंगळुरून | भाजपाकडून जेडीएसच्या काही आमदारांना १०० कोटी आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा द्यावा, हा काळा पैसा येतो कुठून? आता आयकर विभागाचे अधिकारी कुठे आहेत?, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला.

भाजपने आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांचे दुप्पट आमदार फोडू. त्यांचे किमान १५ आमदार आम्ही फोडू शकतो,’ असे थेट आव्हान कुमारस्वामी यांनी दिले. कर्नाटकात निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला. यात भाजप आणि काँग्रेस यांना स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी ११२चा आकडा कोणत्याही पक्षाने पार केला नाही. बहुमतसाठी जेडीएसच्या पाठिंब्या शिवाय कर्नाटकात सत्ता स्थापन करणे शक्य होणार नाही. त्यासाठी भाजप पैसा आणि मंत्री पदाचे आमीष दाखवून जेडीएसला भाजपच्या बाजूने करण्यांचा प्रयत्न सुरू आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमित शहांच्या प्रकृतीत सुधार, एक-दोन दिवसांत मिळणार डिस्चार्ज !

News Desk

शिवसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील

Aprna

निरंजन डावखरे यांची पक्षातून ६ वर्षासाठी हकालपट्टी | शिवाजीराव गर्जे

News Desk
मुंबई

मुंबईची तुंबई झाल्यास राज्यसरकार जबाबदार

News Desk

मुंबई | महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पावसाळ्यापुर्वी मुंबईतील नालेसफाईची पहाणी केली. पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास त्याला महापालिका प्रशासन नव्हे तर राज्यसरकार जबाबदार असेल असे वक्तव्य महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले . महापौरांनी मान्सून अवघ्या काही दिवसात मुंबईत दाखल होण्याची चिन्हे असल्यामुळे नाले सफाईच्या कामाची पाहणी केली.

मुंबईत मेट्रो आणि मोनोरेल मुळे ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी भरले तर त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल असेही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे महापौरांच्या या आरोपावर सरकार काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related posts

आबांपासून फडणवीसांपर्यंत देवेन भारती यांना ‘विशेष’ महत्त्व

Chetan Kirdat

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची भारतीय मानक ब्युरोवर सदस्यपदी नियुक्ती

News Desk

मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

News Desk