HW News Marathi
राजकारण

पालघरमध्ये भाजप विजयी

पालघर | देशाचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा गुरुवारी निकाल लागला. कॉंग्रेस मधून भाजपात आलेले राजेंद्र गावित हे या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार होते तर दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यामुळे या चुरशीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते.गुरुवारी लागलेल्या निकालानुसार राजेंद्र गावित यांना जवळपास २ लाख ७२ हजार ७८२ मते मिळवली तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना सुमारे २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तासच आधी भाजपात आलेले तरीही लोकप्रिय म्हणून मतदानातून सिद्ध झालेले राजेंद्र गावित पालघर मध्ये जास्तीत जास्त मतांनी विजयी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. भाजपचे खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. परंतु त्यांच्याच मुलाला शिवसेनेने उमेदवारी देऊनही जनतेने वनगांच्या बाजूने कौल न दिल्यामुळे ते ही तितकेच चर्चेचा विषय ठरले आहेत.

पालघरमध्ये गावित यांच्या विजयामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का लागल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. विजयानंतर या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. परंतु, आजच भाजपचे वरिष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे निधनाझाल्यामुळे जल्लोष साजरा न करण्याचा आदेश पक्षाच्या वतिने देण्यात आले आहेत. गावित विजयी झाले असले तरी निवडणूक आयोगाकडून याबाबत औपचारिक घोषणा करणे बाकी आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोवा पर्यायी मुख्यमंत्र्यांच्या शोधात

News Desk

रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्यांमधले तुम्ही अर्धवट राव तर नाही ना?

News Desk

शिवसेनेची भूमिका भाजपच्या प्रेयसीसारखी !

News Desk
देश / विदेश

पेट्रोल ७ तर डिझेल ५ पैशांनी स्वस्त  

News Desk

नवी दिल्ली | पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. मोदी सरकारवर सर्वस्तरातून टीका होत होती. सतत होणाऱ्या टीकेमुळे सरकारने पेट्रोल प्रति लिटर ७ पैसे तर डिझेल ५ पैशांनी स्वस्त करुन सर्व सामान्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी पेट्रोलचा दर ७८.३५ रूपये आणि डिझेल ६९.२५ रूपये असा आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८६.१६ रूपये तर डिझेल ७३.७३ रूपये दर आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सलग १६ दिवस इंधन दर वाढ होत होती. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सरकारवर टीकेची झोड उटली होती. सर्व विरोधकांनी इंधन दर वाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलने केली. त्यानंतर सरकारने बुधवारी आणि गुरुवारी दरांमध्ये किरकोळ घट केली आहे. बुधवारी सकाळी पेट्रोल व डिझेलच्या दरात १ पैशांनी घट झाल्याचे स्पष्टीकरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून देण्यात आले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक काळात पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. जवळपास तीन आठवडे इंधनाचे दर वाढलेले नव्हते. मात्र कर्नाटकमध्ये मतदान होताच इंधन दराचा भडका उडाला. त्यानंतर सलग 16 दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढत राहिल्याने त्याची मोठी झळ सर्वसामान्य जनतेला सहन करावी लागली.

 

Related posts

भारतीय सुरक्षा दलाने निष्पाप काश्मीरमधील नागरिकांना मारले !

swarit

विरोधी पक्षाच्या हातात राज्य सरकारशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा!

News Desk

शरद पवारांनीच केला मोदींसोबतच्या भेटीचा खुलासा

News Desk