HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांनीच केला मोदींसोबतच्या भेटीचा खुलासा

नवी दिल्ली | राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष  शरद पवार यांनी आज (१७ जुलै) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. शरद पवार आणि माेदी यांच्‍यातील भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. मोदी-पवारांच्या भेटीवर अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र, यानंतर आता शरद पवारांनीच मोदींच्या भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी ट्विट करत भेटीसंर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांनी भेटीचा फोटो ट्विट केला आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

शरद पवार यांनी मोदींची भेट घेतलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍याशी चर्चा केली असल्याचे कॅप्शनमध्ये पवारांनी नमूद केले आहे.

 

यापूर्वी महाराष्‍ट्रामध्‍ये सरकार स्‍थापन होण्‍यापूर्वी शरद पवार आणि मोदी यांची भेट झाली होती. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पवारांची भेट घेतली होती. यानंतर दुसर्‍याच दिवशी पवारांनी पंतप्रधान मोदींची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली.

हे आहे पवार-मोदींच्या भेटीचं प्रमुख कारण –  जंयंत पाटील

जयंत पाटील यांनी या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं. “देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अब्दुल कुरेशी या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

swarit

माल्ल्याच्या विधानाने जेटली अडचणीत, विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, चार जवान शहीद

swarit